प्रत्येक दिवस हा आयुष्यात उत्कर्ष साधण्याची शक्यता निर्माण करतो. आपल्याला मिळालेला वेळ हीच आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी सुवर्णसंधी असते. या संधीचा लाभ घेता यावा यासाठी दिवसाचा काही शिरस्ता वा परिपाठ असणे अत्यावश्यक आहे. रोजच्यारोज नित्यनेमाने एखादी वस्तुनिष्ठ गोष्ट करत गेल्यास कालांतराने वेळरुपी सुवर्णसंधीचे प्रत्यक्षात सोने होऊ शकते. याउलट एखादा दिवस असाच निष्कारण वाया घालवणे हे एक अमूल्य संधी दवडण्यासारखे आहे, जी पुन्हा फिरून परतत नाही.
Copyright secured by Digiprove © 2021
You must be logged in to post a comment.